Thursday, September 30, 2010

आनंदवनभूवनी


शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी समृद्ध, संपन्न असे ‘आंनदवनभुवन’ च निर्माण केले होते. त्या आनंदवनभुवनाचे वर्णन समर्थ रामदासांनी पुढील शब्दात केले आहे. हे काव्य म्हणजेच छत्रपतींनी पार पाडलेले ‘इतिकर्तव्य’ होय.
 ++++++++++++
स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी, तीर्थासी तुळणा नाही।
आनंदवनभुवनी।।
त्रैलोक्य चालील्या फौजा, सौख्य बंध विमोचने, मोहीम मांडिली मोठी।
आनंदवनभुवनी।।
येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमे , संतोष मांडला मोठा।
आनंदवनभुवनी।।
भक्तांसी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा, भक्तासी दिधले सर्वे।
आनंदवनभुवनी।।
येथूनी वाचती सर्वे ते ते सर्वत्र देखती, सामर्थ्य काय बोलावे।
आनंदवनभुवनी ।।
उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, जप-तप अनुष्ठाने
आनंदवनभुवनी।।
बुडाली सर्वही पापे, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला।
आनंदवनभुवनी।।
आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।
"तेज तलवार भयो
दक्खन कि ढाल भयो
हिंद  कि दिवार भयो
काल तुर्कानको काल तुर्कानको..."


No comments:

Post a Comment