Wednesday, June 9, 2010

अन महाराष्ट्राचा बिहार झाला ,,,

एका पाठोपाठ एक रोज बलात्कार होतात 
सारे गुंड जणु पुण्यातच रहातात 
सार्या गुंडांना आहे येथे मुक्त संचार 
तोंडी गृहमंत्र्यांच्या आहे तम्बाखुचा बार 
अन महाराष्ट्राचा झाला बिहार ,,,  
दिवसा ढवल्या येथे लुबाडली जाते अब्रू
तरीही शोक नाही अशोकाला 
स्वताहाच्याच खुर्चिचे पाय कशाला कापेल हा गब्रु   ?  
राज रोस गुंड नासवतात बाला
अन महाराष्ट्राचा बिहार झाला ,,, 
पुणे तिथे सारेच उणे
स्त्रियांचे जिणे झाले लाजीरवाने 
सोन्याच्या नांगराने फाळलेल्या ह्या  भूमिवर
पुन्हा गाढ़वांचा नांगर फिरतो आहे   
आणि महाराष्ट्र नव्या शिवबाची वाट पहातो आहे 
कारण महाराष्ट्राचा झाला बिहार 
जशी आमची लायकी 
अगदी तस्स्च मिळालय सरकार

No comments:

Post a Comment